Tuesday 26 July 2016

चावंड - एक भटकंती








मध्यंतरी फेसबुकवर एक फोटो बघितला पाण्यात निम्मा बुडालेला दरवाजा आणि सहज ऊत्सुकतेने विचारले पण त्यांनी स्थळ ऊघड करायला नकार दिला पण त्याच कॉमेंटमध्ये एकाने चावंड म्हटले आणि त्यादिवसापासून मनात चावंड घोळत होता,





जुन्नर विभागातले नारायणगड,शिवनेरी,हडसर, निमगिरी, जीवधन आणि नाणेघाट असे सर्व गड पालथे घातल्यावर शिल्लक राहिलेला एक चावंड करण्याचा योग 1 ऑगस्टला जुळून आला.
सकाळी आम्ही सहा वाजता पुणे सोडले .मध्ये नारायणगावला सर्जा हॉटेलमध्ये नाष्टा पाणी करून जुन्नर मध्ये शिवनेरी शेजारून दार्या घाट आटपाळे लिहीलेला रस्ता पकडला.आता रस्ता सुस्थितीत आहे.जाताना रस्त्यात पाण्याने भरलेल्या खाचरात शेतकरयांची भात लागवडीची लगबग चालू होती.त्याठिकाणी थोडे थांबून दोन चार फोटो घेतले.



पुढे चावंड त्याच्या कातळ भिंतींसह ऊभा ठाकला.वर जाण्याचा रस्ता मात्र वळसा घालून चावंड वाडीतून आहे.
गाडी चावंडमध्ये मंदीरापाशी लावली आणि पावसाची मोठी सर आली वाटले आज भिजत ट्रेक करायला लागणार मग प्लास्टीकच्या पिशवीत मोबाईल घेतला पाण्यासाठी एकच सॅक घेतली आणि गडावर  निघालो.
वनविभागाने खाली थोडी सिमाभिंत व निम्म्या अंतरापर्यंत पायरया करून मार्ग सोपा केलाय.वर एक रॉक पॅचही रिलींग लावून सुरक्षित केला आहे नाहीतर पावसाळ्यात जरा अवघड जागा आहे.



रॉक पॅच संपल्यावर वर तटबंदी आणि मुख्य दरवाजा खालील ओबडधोबड पायरया लागल्या.
थोड्या चढाईनंतर 90° च्या कोनात वळून प्रवेशद्वार आहे,थोडा लोखंडी आधार देऊन ऊभे ठेवलेय.त्यावर एक सुबक गणेशाची मुर्ती कोरलीय.




आत जाताच परत वर चढून ऊजवीकडे रस्ता सदरेकडे जातो तिथे दगडातले पाण्याचे मोठे भांडे दिसले.सदरेसमोर जुन्या वाड्याचे प्रशस्त जोते आहे. तिथून पुढे गेल्यावर ऊजवीकडे टेकडीवजा चढ चढून आपण चामुंडेच्या मंदीरात प्रवेश करतो.हे गडाचे सर्वोच्च टोक.तिथेही थोडे विखुरलेले अवशेष दिसतात.मंदीर नव्याने डागडुजी केलेले आहे.



 वरून पूर्ण गडाचे अवलोकन करता येते.गवत खूप असल्याने अवशेष दिसणे अवघड आहे पण पाट्या लावल्याने थोडे काम सोपे झालेय. पण चावंडच्या माथ्यावरून एकीकडे शंभु डोंगर जीवधन नाणेघाटापर्यंतचा परिसर, समोर हडसर, निमगिरी शिंदोळ्यापर्यंत एकीकडे जुन्नर शिवनेरी पर्यंत असा चौफेर नजारा दिसतो.पावसामुळे ढगात लपाछपी खेळणारे चावंडचे सवंगडी अधूनमधून डोकावत होते.




चामुंडेचे मंदीर जुन्नर कल्याण या जुन्या नाणेघाटातून असणारया व्यापारी मार्ग वापरणारया व्यापारयांनी बांधले असावे अथवा स्थापना केली असावी.दर्शन घेऊन टेकडी ऊतरून खाली आलो आणि ऊजवीकडे पुष्करणीकडे जाणारी गवताची वाट पकडली.थोड्या अंतरावर एक टाके लागले आणि त्यापुढे झुडुपात वेढलेली पुष्करणी.एवढे विलक्षण अवशेष हा गड संपन्न असावा याचेच पुरावे देणारे.खर सांगायच तर चांदोबाच्या गोष्टीतील किंवा परिकथेतील जंगलाने वेढलेले आणि आता राबता नसलेले राजवैभव ही पुष्करणी कथन करतेय असे वाटून गेले.पूर्वीच्या वैभवात अशी वास्तू ऊभी राहीली तर? पण ...




पुष्करणीचे वैभव न्याहाळल्यानंतर सप्तमातृका या सात टाक्यांचा समुह शोधण्यास निघालो.यावेळेलाही खूप गवत झुडुपे माजली आहेत त्यामुळे थोड्या शोधानंतर त्या ठिकाणी पोहचलो.अतिशय विस्तीर्ण पूर्णपणे खोदीव व एकमेकास जोडलेल्या सात टाक्यांचा समुह हा अतिशय वैशिष्टयपूर्ण रचनेचा आहे.त्यात पहिल्या टाक्यात ऊतरणारया चिरेबंदी पायरया ऊत्तम स्थितीतील गणेशपट्टी असलेल्या दरवाजाने व बांधकामाने बंदिस्त केल्या आहेत.आत पाण्यात त्या पायरया ऊतरतात.ईथे मला खूप दिवसापासून वाटत असलेली एक गोष्ट नमूद करावी असे वाटते.पाण्याची टाकी ही फक्त पाणी साठवण्याची जागा नसावी तर भूमिगत बांधकामाचा तो एक भाग असावा, काळाच्या ओघात त्यात पाणी जमा होऊन त्याला टाक्याचे स्वरूप आले असावे.कारण चावंडचा विचार केला तर चारही दिशेने जर तोफांचा मारा असला तर सुरक्षित लपायला दुसरी जागा कुठे आहे.यावर एखादा अभ्यासू प्रकाश टाकू शकेल.

सप्तमातृकांची प्रदक्षिणा घालून गुहेच्या शोधात निघालो.पण गुहा काही सापडली नाही.पुन्हा कधीतरी तिचा तपास करू असे ठरले व ऊत्तरेकडच्या बुरूजावरून कुकडी प्रकल्पाचे विहंगम डोळ्यात साठवत थोडा फराळ केला व परतीच्या मार्गास लागलो.

पुढे गड ऊतरून नाणेघाटाच्या दाराशी जाऊन दारूडे व पिकनीकसाठी आलेली जोडपी यांची संख्या पाहून लगेच परत फिरलो.येताना कुकडेश्वर मंदीर पाहण्याचा योग आला.कुकडेश्वर हे अतिशय संप्पन्न अप्रतिम कोरीव काम व अवशेषांनी परिपूर्ण मंदीर चावंडच्या खूपच जवळ आहे.न चुकता पहावे असे.

तिथून पुढे जुन्नरला हॉटेल अभिषेकला दोन माणसांनाही संपणार नाही अशी मर्यादित थाळी खाऊन सर्वांच्या ईच्छेने नारायणगडाची फेरी करायची ठरली.नारायणगड चहूअंगाने मोकळा आणि खूप भावलेला गड.तासाभरातच वर जाऊन मोकळी हवा फुफुस्सात भरून परत फिरलो.रात्री आठला घरी परतलो.
सर्व मोसमात प्रत्येक गड वेगळा भासतो त्यामुळे परत परत एखादा गड फिरलो तरी समाधान मिळते.
मित्रांनो परत भेटू अशाच मनसोक्त भटकंतीत!

गडी:  प्रशांत कोठावदे, मिलींद पाटील, अमोल चांदूरकर, समीर कदम आणि तुषार कोठावदे.
काठीण्य : सोपा.गाईड आवश्यकता नाही.
भोजन:  जुन्नर हॉटेल अभिषेक पण थाळी मर्यादितच घ्यावी.

8 comments:

  1. Ahhaaa... Mast jamlay blog...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद समीर, भटकंती परत चालू करा आता।

      Delete
  2. खुपच छान दादा•••

    ReplyDelete
  3. तुषार, छान ब्लॉग..
    फोटोज लय भारी..
    दुर्गावरची टाकी पाण्यासाठी असतातच, आणि या दुर्गबांधणीसाठी लागणाऱ्या काळ्या दगडाच्या खाणीच!!!
    पुढचा ब्लॉग येवू दे लवकर..

    ReplyDelete
  4. खूप छान, तुषार भाऊ

    ReplyDelete